Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

शिवनिती भाग :- ००३ - छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रशासकीय, व्यवस्थापन धोरण

छत्रपती शिवाजी महाराज” हे नुसतं नाव जरी वाचलं तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. ते फक्त जाणते राजे नव्हते तर, मराठी माणसासाठी ते दैवत आहेत.             महाराजांनी ४०० वर्षांपूर्वी जुलमी मुसलमान राजवटीत पिचलेल्या जनतेची सुटका केली व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य स्थापन केले.                हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी योग्य व्यवस्थापन केलं. त्यांचं नेतृत्व, संघटन कौशल्य, युद्धनीती हे फार उंचीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे उभे आयुष्य हा मोठा विषय आहे.           त्यांचे नेतृत्वगुण, दळणवळणाचे व्यवस्थापन, लढाया, तह, स्वराज्य विस्तार करतानाचे नियोजन, रसद पुरवण्याचे तंत्रज्ञान, स्वराज्य स्थापन करताना नियुक्त केलेले मंत्रिमंडळ, सैन्य दलाची उभारणी ह्या अनेक पैलूंतून त्यांचे व्यवस्थापन कौशल्य बघायला मिळते आणि ते आधुनिक व्यवस्थापनाचे गुरु आहेत ह्याची खात्री पटते.          त्यांच्या संपूर्ण आयुष्यातून अगदी बारीक सारीक घटनांतून दे...

कोल्हापुरातील सत्तांतर

#कोल्हापूर उर्फ करवीर संस्थान- #भाग- ५ #कोल्हापूरातील_सत्तांतर-                    अनेक मराठा सरदार ताराबाईंच्या पक्षातून शाहूमहाराजांच्या पक्षात सामील झाले. परंतु वाडी कुडाळचे खेमसावंत भोसले आणि सिधोजी घोरपडे मात्र ताराबाईंच्याच पक्षात राहिले. खेमसावंतांच्या मदतीने ताराबाईंनी आपला फौजफाटा परत जमवून मालवणहून प्रथम रांगण्याकडे आणि तिथून पन्हाळ्याकडे मोर्चा वळवला. पन्हाळ्यावर असलेल्या शाहूमहाराजांच्या तुटपुंज्या शिबंदीचा ताराबाईंच्या सैन्यापुढे निभाव लागला नाही. विशेष प्रतिकार न होता पन्हाळगड आणि कोल्हापूरचा परिसर परत एकदा ताराबाईंकडे आला.              शाहूमहाराजांकडून पन्हाळा, कोल्हापूरवर परत कब्जा करणे, ही ताराबाईंच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना म्हणता येईल. पन्हाळा आणि कोल्हापूर ही दक्षिणेकडील मोक्याची ठिकाणे ताराबाईंच्या हाती पडल्यामुळे त्यांचे बळ वाढू लागले. शाहूमहाराजांचे लक्ष आता मोगलांच्या हालचालींकडे केंद्रित झाले होते. १७१० साली महाराणी ताराबाईंनी आपल्या कोल्हापूरच्या स्वतंत्र मराठा ...

शिवनिती भाग ०२ :- छत्रपती शिवाजी महाराजांचे सामाजिक धोरण.

चैत्र शुद्ध द्वितीया शालिवाहन शके १९४२ दि. २६ मार्च, २०२०. गुरुवार    शिवनीती :- भाग २         छत्रपती शिवाजी महाराजांचे सामाजिक धोरण...         छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू होऊन जवळपास ३५० वर्षे उलटली तरीही त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाची आठवण झाल्याबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला अभिमान वाटतो. छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्याची महाराष्ट्रात पायाभरणी करून जगासोबतच भारताला ‘स्वराज्याचा’ पहिला धडा दिला. छ.शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य आकाराने खूप लहान असले तरीही ते संपूर्ण भारतामध्ये त्याकाळी स्वतंत्र आणि सार्वभौम होते. छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करीत असताना स्वराज्याचे रूपांतर सुराज्यामध्ये करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. म्हणून महाराष्ट्रातील अठरा पगड जातींच्या लोकांना 'हिंदवी स्वराज्य' हे आपलेच स्वतःचे स्वराज्य आहे असे वाटत होते. हिंदवी स्वराज्याच्या जडण-घडणीसाठी बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार, गावकुसातील आणि गावकुसाबाहेरील प्रत्येकांनी आपले सर्वस्व छ.शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभे केले. त्यामुळेच शिवाजी...

शिवनिती भाग ०१ :- प्रस्तावना

शिवनीती दि. 25 मार्च, 2020 (बुधवार) चैत्र शुद्ध प्रथमा, शालिवाहन शके १९४२ संवत - २०७७     अनेक दिवसांपासून आपणास ज्या गोष्टींची प्रतिक्षा होती तो क्षण उद्या पासून म्हणजेच "शिवनीती" आज पासून वाचकांना सादर करत आहोत, त्याचे सविस्तर स्वीकार व्हावा.     शिवनीती          छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे कार्य त्यांनी करत गेले. उपलब्ध मनुष्यबळ आणि निसर्गाच्या साथीने महाराजांनी अनेक यशस्वी अशा लढाया करत, जगाला आदर्श दाखवून दिला, की जगात असे देखील कार्य करू शकता. आतापर्यंत अनेक लेखकांनी महाराजांनी केलेले कार्य कर्तृत्व व राजनीतीवर वेगवेगळे शब्द प्रयोग करत, मूळ कार्य हेतुपासून शब्दाचा विपर्यास होत गेल्याचे दिसते. महाराजांनी उपलब्ध निसर्गाचा वापर करत लढाया व रणनीती करत गेले, ह्याला अनेकांनी महाराजांच्यावर लेखन करताना 'गनिमी कावा' असा शब्द प्रयोग केला आहे, पण आम्ही ह्या शब्द प्रयोगाचे खंडण करत ह्या लेखकांना आवर्जून सांगू इच्छितो की 'गनिमीकावा' नाहीतर "शिवनीती" शब्द वापरावेत. ह्यामागे अनेक कारणांमुळे सांगत आहोत, ह्याचाच पहिला भाग म्हणून आम्ही लेखनाचा पह...